भीमा - कोरेगाव येथील स्मारक स्तंभावरील पाट्यांचे सचित्र विश्लेषण :-
छायाचित्र क्रमांक १) इंग्रजी मजकूर
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
या पाटीवरील मजकुराची पहिली ओळ अतिशय महत्त्वाची आहे. या ओळीचा असा अर्थ आहे कि, कोरेगावच्या लढाईत बचाव केल्याबद्दल स्मारक बनवण्यात येत आहे. या बचावात्मक लढाईत ज्यांनी वीर मरण पत्करले त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आल्याचे पुढील मजकुरात नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भीमा - कोरेगाव येथील लढाईत ब्रिटीशांचा विजय झाल्याचा अजिबात उल्लेख करण्यात आला नाही.
छायाचित्र क्रमांक २) मराठी मजकूर
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
छायाचित्र क्रमांक १) मध्ये जो इंग्रजी भाषेत मजकूर आहे त्याची हि मराठी आवृत्ती असून या पाटीचे शीर्षकच मुळी ' जयस्तंभ ' आहे. त्याशिवाय खालील मजकुरात कोरेगावच्या संग्रामाची त्रोटक माहिती असून त्यात इंग्रजी लोकांचा विजय झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
छायाचित्र क्रमांक ३) इंग्रजी मजकूर
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
वरील पाटीमधील इंग्रजी मजकुरात भीमा - कोरेगाव युद्धातील जखमी - मृत वीरांचा नामोल्लेख केला आहे. पण या लढाईमध्ये इंग्रज जिंकले असे चुकूनही लिहिले गेलेलं नाही.
छायाचित्र क्रमांक ४)
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. भीमा - कोरेगाव संग्रामातील मृत - जखमी वीरांची नावे यात दिलेली आहेत. उदाहरणार्थ, मुंबई सरकारच्या दुसऱ्या ग्रेनेडीयर रेजिमेंट मधील मृतांची नावे :- बापू सिंदा जमातदार, गणोजी गोरे जमातदार, कानसिंग हवालदार, इटमेतखाळमेतर नाईक, सोननाक कमळनाक नाइक, रामनाक येसनाक नाइक, प्रसादशिंग सिफाइ, लक्ष्मण व (ब ?) दोसा सिपाई, बाबु सावंत सिपाई, गोंदनाक कोठे (?)नाक सिपाइ, रामनाक येसनाक सिपाइ, लक्ष्मण कुकडा सिपाइ, भागनाक हरनाक सिपाई, राघोजी मोद्रे सिपाई इ.
उपरोक्त नावे वानगीदाखल दिलेली आहेत. या पाटीवरील मजकुरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पातीच्या आरंभी स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि, ' मौजे कोरेगाव येथे इंग्रजी लोक लढाईत जय मेळउन पडले व जखमी जाले त्यांची नावे ' छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुरात या अर्थाची वाक्ये अजिबात लिहिली गेली नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि, भीमा - कोरेगावच्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला हे लोकांच्या मनी ठसवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम एतद्देशीय भाषेत बनवलेल्या पाटीत - आपण कोरेगाव येथे विजयी झालो - असे खोदवून घेतले.
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
या पाटीवरील मजकुराची पहिली ओळ अतिशय महत्त्वाची आहे. या ओळीचा असा अर्थ आहे कि, कोरेगावच्या लढाईत बचाव केल्याबद्दल स्मारक बनवण्यात येत आहे. या बचावात्मक लढाईत ज्यांनी वीर मरण पत्करले त्यांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आल्याचे पुढील मजकुरात नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे भीमा - कोरेगाव येथील लढाईत ब्रिटीशांचा विजय झाल्याचा अजिबात उल्लेख करण्यात आला नाही.
छायाचित्र क्रमांक २) मराठी मजकूर
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
छायाचित्र क्रमांक १) मध्ये जो इंग्रजी भाषेत मजकूर आहे त्याची हि मराठी आवृत्ती असून या पाटीचे शीर्षकच मुळी ' जयस्तंभ ' आहे. त्याशिवाय खालील मजकुरात कोरेगावच्या संग्रामाची त्रोटक माहिती असून त्यात इंग्रजी लोकांचा विजय झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
छायाचित्र क्रमांक ३) इंग्रजी मजकूर
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
वरील पाटीमधील इंग्रजी मजकुरात भीमा - कोरेगाव युद्धातील जखमी - मृत वीरांचा नामोल्लेख केला आहे. पण या लढाईमध्ये इंग्रज जिंकले असे चुकूनही लिहिले गेलेलं नाही.
छायाचित्र क्रमांक ४)
( फोटोमधील मजकूर वाचण्यासाठी कृपया फोटोवर माऊसने क्लिक करावे. )
छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुराचा हा मराठी अनुवाद आहे. भीमा - कोरेगाव संग्रामातील मृत - जखमी वीरांची नावे यात दिलेली आहेत. उदाहरणार्थ, मुंबई सरकारच्या दुसऱ्या ग्रेनेडीयर रेजिमेंट मधील मृतांची नावे :- बापू सिंदा जमातदार, गणोजी गोरे जमातदार, कानसिंग हवालदार, इटमेतखाळमेतर नाईक, सोननाक कमळनाक नाइक, रामनाक येसनाक नाइक, प्रसादशिंग सिफाइ, लक्ष्मण व (ब ?) दोसा सिपाई, बाबु सावंत सिपाई, गोंदनाक कोठे (?)नाक सिपाइ, रामनाक येसनाक सिपाइ, लक्ष्मण कुकडा सिपाइ, भागनाक हरनाक सिपाई, राघोजी मोद्रे सिपाई इ.
उपरोक्त नावे वानगीदाखल दिलेली आहेत. या पाटीवरील मजकुरातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पातीच्या आरंभी स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे कि, ' मौजे कोरेगाव येथे इंग्रजी लोक लढाईत जय मेळउन पडले व जखमी जाले त्यांची नावे ' छायाचित्र क्रमांक ३) मधील इंग्रजी मजकुरात या अर्थाची वाक्ये अजिबात लिहिली गेली नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे कि, भीमा - कोरेगावच्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला हे लोकांच्या मनी ठसवण्यासाठी इंग्रजांनी मुद्दाम एतद्देशीय भाषेत बनवलेल्या पाटीत - आपण कोरेगाव येथे विजयी झालो - असे खोदवून घेतले.
विवेचन :- भीमा - कोरेगावची लढाई
इंग्रजांनी जिंकली असाच सर्वांचा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात ती लढाई ना
इंग्रजांनी जिंकली ना पेशव्यांनी ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील ती एक
अनिर्णीत लढाई असल्याचे मी मागील लेखात साधार स्पष्ट केले आहे. ( पहा अथवा
पाहू नका :-
http://peshwekalinitihas.blogspot.in/2012/06/blog-post.html ) परंतु, असे
असले तरी भीमा - कोरेगाव येथील संग्रामात इंग्रजांचा विजय झाला हा लोकांचा
समज अजूनही दृढचं आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता असे दिसून आले कि,
इंग्रज अधिकाऱ्यांनी बनवेगिरी करून, आपण भीमा - कोरेगावचे युद्ध जिंकले
असे बळेच उठवून दिले होते. चतुर इंग्रज यावरच थांबले नाहीत तर भीमा -
कोरेगाव येथील स्मारक स्तंभाचे त्यांनी जयस्तंभात देखील रुपांतर केले.
या स्मारकावर इंग्रजी व मराठी भाषेत मजकूर खोदलेल्या दोन पाट्या
तत्कालीन इंग्रज सरकारने लावल्या आहेत. पैकी इंग्रजी पाटीवरील मजकुरात ते
लिहितात कि, भीमा - कोरेगाव येथील संग्रामात बचाव केल्याबद्दल हे स्मारक
उभारण्यात येत आहे. अर्थात, त्यावेळी इंग्रजांची भाषा इतद्देशियांपैकी
कितीजणांना समजत होती ? त्यामुळे हाच मजकूर मराठी भाषेत लिहिण्यात आला पण
तो लिहिताना एक छोटासा फेरबदल करण्यात आला. त्यानुसार भीमा - कोरेगाव येथील
स्मारकस्तंभ ' जय स्तंभ ' बनून भीमा - कोरेगावच्या लढाईत इंग्रजांचा विजय
झाल्याचे लिहिण्यात आले. यामागील इंग्रजांचा हेतू उघड होता.
पेशवाईचा अस्त नुकताच झाला असला तरी या देशावर, विशेषतः
महाराष्ट्रावर, इंग्रजांची म्हणावी तशी अजून पक्की पकड बसली नव्हती. (
उमाजी नाईकांनी याच काळात इंग्रजांच्या विरोधात उठाव केला होता. ) मराठी
संस्थानिक अजून जिवंत होते आणि महत्त्वाचे म्हणजे सातारकर छत्रपतींचा
जनसामान्यांमध्ये अजूनही नावलौकिक होता ! तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात
पेशव्यांनी छत्रपतींचे बळकावलेले राज्य सोडवून परत छत्रपतींना देणार
असल्याची घोषणा इंग्रजांनी केली होती. या पार्श्वभूमीवर स. १८१९ मध्ये
जेव्हा सातारकर व इंग्रजांमध्ये तह घडून आला तेव्हा सातारकरांना
पेशव्यांच्या अंमलाखालील असलेले संपूर्ण राज्य न मिळता काही जिल्ह्यांचे
नाममात्र स्वतंत्र राज्य मिळाले. बरे, सातारकर आता स्वतंत्र राजे न राहता
इंग्रजांचे मांडलिक देखील बनले !
हि घटना लक्षात हेऊन भीमा - कोरेगावच्या स्मारकस्तंभांवरील मराठी
भाषेतील मजकुराकडे पाहावे लागेल. इंग्रजी अंमल देशी संस्थानिकांनी किंवा
लोकांनी सुखासुखी मान्य केला नव्हता. इंग्रजांचे राज्य तलवार आणि राजकीय
संधिसाधूपणा / धूर्तता यांवर टिकून होते. एतद्देशीय संस्थानिक / लोक
आपल्यावर चिडून आहेत हे इंग्रज जाणून होते. त्याचप्रमाणे ते एकसंध नसल्याने
व त्यांच्यावर आपली दहशत असल्याने ते गप्प असल्याचे त्यांना माहिती होते.
देशी संस्थानिकांवरील / लोकांवरील इंग्रज सरकारचा हा वचक / जरब असाच कायम
राहावा यासाठीच माझ्या मते त्यांनी भीमा - कोरेगाव येथील स्मारकावरील
मजकुरात खोडसाळपणा केला. या व्यतिरिक्त मला दुसरे काही सयुक्तिक कारण दिसत
नाही.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेले फोटो मला उलपब्ध करून देण्याचे कार्य श्री अनिल सुरवासे व श्री. अनिल वळसे यांनी केले आहे. त्यांच्या या सक्रीय सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत.