' महार ' या जातीचा उगम वा
निर्मिती याविषयी श्री. संजय सोनवणी यांनी आपल्या ' महार कोण होते ? ' या
ग्रंथात संशोधनाद्वारे जे काही निष्कर्ष नोंदवले आहेत त्याच्याशी मी
संपूर्ण सहमत असल्याने महारांच्या पूर्वेतिहासाविषयी या ठिकाणी अधिक
तपशीलवार चर्चा करणार नाही.
मराठेशाहीच्या इतिहासाचा आरंभ शिवाजीच्या स्वराज्यस्थापने पासून होतो. तेव्हा तत्कालीन मराठेशाहीत व त्याच्याही आधीच्या स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात महारांची सामाजिक स्थिती किंवा दर्जा हा कोणत्या प्रकारचा होता हे आधी आपण पाहू.
स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात व नंतरच्या काळात देखील ग्रामीण जीवनात महाराचे स्थान हे पहिल्या प्रतीच्या बलुतेदाराचे होते. त्याशिवाय महार हे वतनदार देखील होते. महार समाजास बेदरच्या बादशाहाने सुमारे 52 हक्कांची सनद दिल्याचा उल्लेख मिळतो. ( स. 1475 ) या 52 हक्कांच्या प्राप्तीसाठी महारांना नेमून दिलेली कामे करणे अनिवार्य बनले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे बेदरच्या बहामनी बादशहाने जी काही 52 हक्कांची सनद महारांना दिली आहे ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्या सनदेत नमूद केले आहे. या ठिकाणी काही प्रश्न उद्भवतात ते असे :- महारांना किंवा इतर कोणत्या जातीला अशा प्रकारचे 52 किंवा त्याहून कमी - जास्त हक्क देण्यात आले होते का ? अशा प्रकारच्या हक्कांची मागणी यावेळी बहामनी बादशहाकडे कोणी केली होती का ? कारण, सनदेमधील भाषा पाहता या हकांसाठी इतरही जाती उत्सुक असल्याचे दिसून येते आणि या 52 हक्कांच्या सनदेच्या पाठीमागे अतिशय भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. याखेरीज अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे कि, सोमवंशी महार म्हणजे नेमके कोणते महार ? 52 हक्कांची जी सनद बहामनी बादशाहने महारांना दिली ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्याच सनदेमध्ये नमूद केले आहे.
वरील निष्कर्षावरून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात व ते म्हणजे (1) 52 हक्कांची सनद हि महारांच्या अस्पृश्यतेचा जर पाया समजली गेली तर ही अस्पृश्यता फक्त सोमवंशी महारांशी संबंधित असायला हवी. पण तत्कालीन व सद्यस्थितीतील वस्तुस्थिती काय आहे ?
(2) पहिल्या प्रश्नातच दुसरा प्रश्न अंतर्भूत आहे व तो म्हणजे जर ती 52 हक्कांची सनद फक्त सोमवंशी महारांनाच मिळाली असे गृहीत धरले तर आज हे सोमवंशी महार आहेत कुठे ? महार समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
शिवपूर्वकाळात महारांना ग्रामीण जीवनात महत्त्वाचे स्थान होते हे निश्चित पण ते अस्पृश्य होते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
शिवाजीच्या काळात म्हणजेच मराठेशाहीमध्ये महारांचे स्थान हे पूर्ववत राहिले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे बहामनी बादशहाने सोमवंशी महारांना जी सनद दिली होती, त्या सनदेला वेगवेगळ्या राजवटींकडून वेळोवेळी मान्यता मिळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. सामान्यतः वतनदार ज्याप्रमाणे राजवट बदलली कि शासनकर्त्याकडून आपल्या वतनास मान्यता मिळवून घेतो त्यातलाच हा प्रकार ! परंतु, या ठिकाणी हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे कि, बहामनी बादशहाकडून जी सनद सोमवंशी महारांना मिळाली त्या सनदेस परवानगी देताना त्यातील 52 हक्कांमध्ये आणि त्याबदल्यात महारांनी करायच्या कामांमध्ये प्रसंगानुसार बदल झाला असण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजीच्या लष्करात महारांना प्रवेश होता किंवा शिवाजीच्या सैन्यात महार लोकं होती असे सर्रास सांगितले जाते पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि शिवाजीच्याआधी देखील महार लोकं लष्करी वा तत्सम सेवेत कार्यरत होते. जर अशी पूर्वपरंपरा नसती तर शिवाजीने महारांना लष्करात प्रवेशच दिला नसता. शिवाजी हा लोकोत्तर पुरुष होता हे मान्य ! परंतु, त्याच्या विचारातील पुरोगामीपणा अथवा क्रांती हि फक्त राजकीय आणि लष्करी क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सामाजिक बाबतीत त्याने फारशी क्रांतिकारक पावले उचलली नाहीत व हा काही त्याचा दोष नाही. तो ज्या काळात, समाजात वावरत होता त्या काळाची, समाजाची बंधने काही प्रमाणात तरी पाळणे त्यास आवश्यक असेच होते. सामाजिक किंवा जातींच्या बाबतीत शिवाजीचे धोरण कसे होते हे आपल्यास शिवाजीच्या अस्सल पत्रावरून अभ्यासता येऊ शकते. { जातींविषयक शिवाजीचे धोरण वा त्याची आज्ञा पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post.html }
शिवाजीचे जातींविषयक धोरण पाहिले असता काही शंका मनामध्ये निर्माण होतात. त्यातील प्रमुख म्हणजे शिवाजीला नेमके काय अपेक्षित आहे ? ब्राम्हणांनी आपला अध्ययन, विद्यादान व भिक्षुकीचा परंपरागत व्यवसाय करायचा कि उपजीविकेसाठी मिळेल तो धंदा करायचा ? कारण ; शिवाजीचे कित्येक मंत्री, सरदार हे ब्राम्हण होते. शिवाजीची जातींविषयक आज्ञा पाहता या सर्व ब्राम्हण सरदार - मंत्र्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून परंपरागत व्यवसाय करायला पाहिजे होते परंतु, तसे न करता ते क्षत्रियाचे काम करताना दिसतात. शिवाजीनंतर संभाजी छत्रपती बनला. त्याचा विश्वासू सल्लागार कवी कलश हा स्वतःला ' वर्णाश्रमधर्मप्रतिपालक ' म्हणवतो. { कवी कलशचे आज्ञापत्र :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post_28.html } यावरून असेही म्हणता येते कि स्वतः संभाजी हा देखील वर्णाश्रमपद्धतीचा पुरस्कर्ता असावा. अन्यथा, त्याच्या सेवकाने अशा अर्थाची उपाधी स्वतःला लावून घेतली नसती, किंबहुना संभाजीने त्याला अशी पदवी धारणच करून दिली नसती !
यावरून शिवाजी व संभाजीच्या सामाजिक धोरणांतील अर्थ लक्षात येतो. सामाजिक प्रथांमध्ये फारशी ढवळाढवळ न करता व्यवहारात जातींचे फाजील स्तोम माजू न देण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते. अव्वल मराठेशाहीत महारांना लष्करात प्रवेश तर होताच त्याशिवाय किल्य्यावर देखील त्यांची नेमणूक केली जात असे. किल्ल्यावरील मेटेकरी म्हणून जो रक्षक वर्ग असे त्यात महारांचा भरणा असे. किल्लेदारीचे पद त्यांना दिल्याचे उल्लेख काही लेखकांनी केले आहेत पण त्यासाठी आवश्यक तो पुरावा त्यांनी दिला नाही. अव्वल मराठेशाहीमधील पुढील दोन उदाहरणे महारांचा सामाजिक दर्जा काही प्रमाणात स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत असे मला वाटते. ती 2 उदाहरणे खालीलप्रमाणे :- (1) औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मराठ्यांचा व त्याचा दीर्घकाळ लढा जुंपला. या लढ्यात मराठ्यांप्रमाणेच अनेक जातींमधील लोकांनी देखील प्रामुख्याने सहभाग घेतला. यापैकी महार समाजातील शिदनाक या महार सरदाराचे उदाहरण या ठिकाणी पुरेसे आहे. त्याने सजातीय लोकांची एक पलटण उभारून मोगलांशी झुंज दिली. त्याच्या या पराक्रमाची दखल संभाजीपुत्र शाहूने घेऊन त्यास कळंबी हे गाव इनाम दिले. हे गाव त्याच्या वंशात पुढे इनाम म्हणून चालू राहिले. पेशवाईमध्ये देखील त्याच्या वंशजांनी सरकार चाकरी बजावली. खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईमध्ये उपरोक्त शिदनाकचा नातू शिदनाक याने पेशव्यांच्या वतीने युद्धात सहभाग घेतल्याचा उल्लेख मिळतो. यावरून असे दिसून येते कि, पेशवाईअखेर पर्यंत तरी महारांना अस्पृश्य समजण्यात येत नव्हते. अन्यथा एका महार व्यक्तीस शाहू छत्रपतीने गाव इनाम दिलेच नसते. तसेच एका अस्पृश्याकडे पेशव्यांनी, छत्रपती नामधारी झाल्यावर, सदर गाव इनाम म्हणून चालू दिले नसते !
(2) वाई प्रांतातील नागेवाडी या गावाची पाटीलकी महार घराण्यात असल्याचा उल्लेख अस्सल कागदपत्रांमध्ये आढळून येतो. यावरून पाटीलकी पदावर फक्त मराठा जातीतील लोकांची नियुक्ती केली जात असे असा जो समज आहे तो निराधार असल्याचे दिसून येते. या दोन उदाहरणांवरून अव्वल मराठेशाहीमध्ये तरी महार अस्पृश्य असल्याचे दिसून येत नाही.
पेशवाईमध्ये देखील महारांच्या स्थानास धक्का बसल्याचे किंवा त्यांची अवनती झाल्याचे दिसून येत नाही. अपवाद फक्त पेशवाई अखेरीचा ! पेशवाईमध्ये लष्करी सेवेत महारांचा दर्जा उंचावल्याचे दिसून येते. त्याकाळात लढाईआमध्ये परक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' हा बहुमान दिला जात असे व कित्येक प्रसंगी हा बहुमान महार व्यक्तींनी पटकावल्याचे नमूद आहे. याशिवाय शनिवारवाड्याच्या आत पहारेकरी म्हणून देखील महारांची नियुक्ती केली जात असे. यावरून त्यावेळी महारांची अस्पृश्यतेची कल्पना यावी.
पेशवाईमधील महारांच्या या स्थानास एका नाजूक कारणाने धक्का बसला. शनिवारवाड्यातील एका स्त्रीचा व महार रक्षकाचा संबंध जुळून आला. हि बाब उघडकीस येताच पेशव्याने त्या महार पहारेकऱ्यास देहदंडाची शिक्षा दिली. परंतु एवढे करून पेशव्याचा राग शमला नाही तर पुणे शहरात प्रवेश करताना महार जातीच्या लोकांनी गळ्यात मडके व कमरेस झाडाची फांदी अथवा खराटा बांधावा अशी त्याने आज्ञा देखील काढली. हि आज्ञा नेमक्या कोणत्या पेशव्याने काढली याचा उलगडा होत नाही. जेव्हा ते आज्ञापत्रक मला उपलब्ध होईल त्यावेळी या ब्लॉगवर ते प्रसिद्ध करण्यात येईल. पेशव्याने महार समाजास उद्देशून जी आज्ञा काढली ती बहुतेक पुणे शहरापुरतीच मर्यादित असावी. जर तसे नसते व हि आज्ञा सबंध राज्यात काढण्यात आली असती तर पेशव्याच्या लष्करातील महारांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पेशव्यांच्या शत्रूंकडे धाव घेतली असती. नारायणराव पेशव्याने प्रभू लोकांच्या विरोधात अशाच प्रकाराची आज्ञा काढून आपला घात ओढवून घेतला होता हे इतिहासात प्रसिद्ध आहेच ! तेव्हा महारांनी देखील अशा पद्धतीचा एखादा प्रयत्न केलाच नसता असे म्हणता येत नाही. असो, यावरून असे सिद्ध होते कि, महारांना अवमानकारक जी आज्ञा पेशव्यांनी काढली होती ती फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती. कदाचित आसपासच्या गावांमध्ये देखील याचे पडसाद उमटले असतील.
स. 1817 - 18 मध्ये इंग्रजांशी पेशव्यांनी जो अखेरचा निर्णायक लढा पुकारला त्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी दोन्ही पक्षांच्या वतीने सहभाग घेतला होता. पैकी महारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भीमा - कोरेगावच्या अनिर्णीत लढ्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यातील महारांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून निर्णायक पराभव व त्यानंतर होणारी कत्तल टाळली. रायगडावर इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा किल्ल्याच्या बचावासाठी पेशव्याच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या संग्रामात महारांनी देखील किल्ला लढवताना आपल्या धन्यासाठी, ब्राम्हण पेशव्यासाठी मरण पत्करले !
पेशवाई नष्ट झाल्यावर इंग्रजाची राजवट सुरु झाली. या राजवटीने महारांच्या पदरात फारसे काही पडले नाही. बहामनी बादशहाने त्यांना दिलेल्या सनदेची ब्रिटीश काळात परत एकदा उजळणी झाली. ग्रामीण जीवनात महार हा पहिल्या प्रतीचा बलुतेदार असून तसाच तो वतनदार देखील होता. वतनदारांच्या बाबतीत शिवाजी आणि इंग्रज यांचे धोरण जवळपास एकसारखेच होते. त्यांनी वतने कायम राखली, वतनदार देखील कायम राखले पण त्यांचे अधिकार काढून घेऊन त्यांना सरकारी नोकर बनवले. इंग्रजांच्या या धोरणामुळे महारांचे अधिक नुकसान झाले असे म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे, महारांनी बहामनी बादशहाच्या सनदेस इंग्रजांच्या कडून मान्यता मिळवून घेऊन स्वतःचा घात करून घेतला. यामुळे त्यांना 52 हक्कांच्या बदल्यात काही अनिवार्य कामे करणे बंधनकारक बनले. त्याशिवाय बलुतेदार म्हणून जी काही त्यांच्यावर जी काही जबाबदारी होती ती पार पाडणे, वतनदार म्हणून सरकारी आणि गावाची कामे पार पाडणे अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य असे बनले. एकूण, महारांनी स्वतःच्या हातून स्वतःच्या पायात ' गुलामगिरी ' च्या, ' दारिद्र्याच्या ' शृंखला अडकवून घेतल्या असे म्हणता येते !
ब्रिटीश काळात महारांच्या सामाजिक दर्ज्यात कमालीची घसरण होत गेली. पेशवाई अखेरीस पुणे शहरात त्यांच्यावर गळ्यात मडके व कमरेला फांदी / खराटा बांधण्याची जी शिक्षा किंवा सक्ती केली गेली होती ती ब्रिटीशकाळात देखील कायम राहिली. इतकेच नव्हे तर या प्रथेची अंमलबजावणी पेशवे काळात फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती ती ब्रिटीश काळात सर्वत्र प्रचलित झाली ! ब्रिटीश राजवटीने अशा प्रकारे महारांच्या सामाजिक अवनतीस, त्यांच्या अस्पृश्य होण्याच्या क्रियेस एकप्रकारे हातभार लावला असे का म्हणू नये ?
संदर्भ ग्रंथ :-
1) महार कोण होते ? :- संजय सोनवणी
2) शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास :- अनिल कठारे
3) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर
मराठेशाहीच्या इतिहासाचा आरंभ शिवाजीच्या स्वराज्यस्थापने पासून होतो. तेव्हा तत्कालीन मराठेशाहीत व त्याच्याही आधीच्या स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात महारांची सामाजिक स्थिती किंवा दर्जा हा कोणत्या प्रकारचा होता हे आधी आपण पाहू.
स्वराज्यस्थापनेच्या आधीच्या काळात व नंतरच्या काळात देखील ग्रामीण जीवनात महाराचे स्थान हे पहिल्या प्रतीच्या बलुतेदाराचे होते. त्याशिवाय महार हे वतनदार देखील होते. महार समाजास बेदरच्या बादशाहाने सुमारे 52 हक्कांची सनद दिल्याचा उल्लेख मिळतो. ( स. 1475 ) या 52 हक्कांच्या प्राप्तीसाठी महारांना नेमून दिलेली कामे करणे अनिवार्य बनले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे व ती म्हणजे बेदरच्या बहामनी बादशहाने जी काही 52 हक्कांची सनद महारांना दिली आहे ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्या सनदेत नमूद केले आहे. या ठिकाणी काही प्रश्न उद्भवतात ते असे :- महारांना किंवा इतर कोणत्या जातीला अशा प्रकारचे 52 किंवा त्याहून कमी - जास्त हक्क देण्यात आले होते का ? अशा प्रकारच्या हक्कांची मागणी यावेळी बहामनी बादशहाकडे कोणी केली होती का ? कारण, सनदेमधील भाषा पाहता या हकांसाठी इतरही जाती उत्सुक असल्याचे दिसून येते आणि या 52 हक्कांच्या सनदेच्या पाठीमागे अतिशय भीषण दुष्काळाची पार्श्वभूमी आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. याखेरीज अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा आहे कि, सोमवंशी महार म्हणजे नेमके कोणते महार ? 52 हक्कांची जी सनद बहामनी बादशाहने महारांना दिली ती फक्त सोमवंशी महारांना दिल्याचे त्याच सनदेमध्ये नमूद केले आहे.
वरील निष्कर्षावरून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात व ते म्हणजे (1) 52 हक्कांची सनद हि महारांच्या अस्पृश्यतेचा जर पाया समजली गेली तर ही अस्पृश्यता फक्त सोमवंशी महारांशी संबंधित असायला हवी. पण तत्कालीन व सद्यस्थितीतील वस्तुस्थिती काय आहे ?
(2) पहिल्या प्रश्नातच दुसरा प्रश्न अंतर्भूत आहे व तो म्हणजे जर ती 52 हक्कांची सनद फक्त सोमवंशी महारांनाच मिळाली असे गृहीत धरले तर आज हे सोमवंशी महार आहेत कुठे ? महार समाजातील विचारवंतानी आणि अभ्यासकांनी या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
शिवपूर्वकाळात महारांना ग्रामीण जीवनात महत्त्वाचे स्थान होते हे निश्चित पण ते अस्पृश्य होते असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल.
शिवाजीच्या काळात म्हणजेच मराठेशाहीमध्ये महारांचे स्थान हे पूर्ववत राहिले. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे व ती म्हणजे बहामनी बादशहाने सोमवंशी महारांना जी सनद दिली होती, त्या सनदेला वेगवेगळ्या राजवटींकडून वेळोवेळी मान्यता मिळवून घेण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला होता. सामान्यतः वतनदार ज्याप्रमाणे राजवट बदलली कि शासनकर्त्याकडून आपल्या वतनास मान्यता मिळवून घेतो त्यातलाच हा प्रकार ! परंतु, या ठिकाणी हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे कि, बहामनी बादशहाकडून जी सनद सोमवंशी महारांना मिळाली त्या सनदेस परवानगी देताना त्यातील 52 हक्कांमध्ये आणि त्याबदल्यात महारांनी करायच्या कामांमध्ये प्रसंगानुसार बदल झाला असण्याची दाट शक्यता आहे.
शिवाजीच्या लष्करात महारांना प्रवेश होता किंवा शिवाजीच्या सैन्यात महार लोकं होती असे सर्रास सांगितले जाते पण या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे कि शिवाजीच्याआधी देखील महार लोकं लष्करी वा तत्सम सेवेत कार्यरत होते. जर अशी पूर्वपरंपरा नसती तर शिवाजीने महारांना लष्करात प्रवेशच दिला नसता. शिवाजी हा लोकोत्तर पुरुष होता हे मान्य ! परंतु, त्याच्या विचारातील पुरोगामीपणा अथवा क्रांती हि फक्त राजकीय आणि लष्करी क्षेत्रापुरतीच मर्यादित होती. सामाजिक बाबतीत त्याने फारशी क्रांतिकारक पावले उचलली नाहीत व हा काही त्याचा दोष नाही. तो ज्या काळात, समाजात वावरत होता त्या काळाची, समाजाची बंधने काही प्रमाणात तरी पाळणे त्यास आवश्यक असेच होते. सामाजिक किंवा जातींच्या बाबतीत शिवाजीचे धोरण कसे होते हे आपल्यास शिवाजीच्या अस्सल पत्रावरून अभ्यासता येऊ शकते. { जातींविषयक शिवाजीचे धोरण वा त्याची आज्ञा पुढील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post.html }
शिवाजीचे जातींविषयक धोरण पाहिले असता काही शंका मनामध्ये निर्माण होतात. त्यातील प्रमुख म्हणजे शिवाजीला नेमके काय अपेक्षित आहे ? ब्राम्हणांनी आपला अध्ययन, विद्यादान व भिक्षुकीचा परंपरागत व्यवसाय करायचा कि उपजीविकेसाठी मिळेल तो धंदा करायचा ? कारण ; शिवाजीचे कित्येक मंत्री, सरदार हे ब्राम्हण होते. शिवाजीची जातींविषयक आज्ञा पाहता या सर्व ब्राम्हण सरदार - मंत्र्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून परंपरागत व्यवसाय करायला पाहिजे होते परंतु, तसे न करता ते क्षत्रियाचे काम करताना दिसतात. शिवाजीनंतर संभाजी छत्रपती बनला. त्याचा विश्वासू सल्लागार कवी कलश हा स्वतःला ' वर्णाश्रमधर्मप्रतिपालक ' म्हणवतो. { कवी कलशचे आज्ञापत्र :- http://sanjaykshirsagar24.blogspot.in/2012/05/blog-post_28.html } यावरून असेही म्हणता येते कि स्वतः संभाजी हा देखील वर्णाश्रमपद्धतीचा पुरस्कर्ता असावा. अन्यथा, त्याच्या सेवकाने अशा अर्थाची उपाधी स्वतःला लावून घेतली नसती, किंबहुना संभाजीने त्याला अशी पदवी धारणच करून दिली नसती !
यावरून शिवाजी व संभाजीच्या सामाजिक धोरणांतील अर्थ लक्षात येतो. सामाजिक प्रथांमध्ये फारशी ढवळाढवळ न करता व्यवहारात जातींचे फाजील स्तोम माजू न देण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून येते. अव्वल मराठेशाहीत महारांना लष्करात प्रवेश तर होताच त्याशिवाय किल्य्यावर देखील त्यांची नेमणूक केली जात असे. किल्ल्यावरील मेटेकरी म्हणून जो रक्षक वर्ग असे त्यात महारांचा भरणा असे. किल्लेदारीचे पद त्यांना दिल्याचे उल्लेख काही लेखकांनी केले आहेत पण त्यासाठी आवश्यक तो पुरावा त्यांनी दिला नाही. अव्वल मराठेशाहीमधील पुढील दोन उदाहरणे महारांचा सामाजिक दर्जा काही प्रमाणात स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत असे मला वाटते. ती 2 उदाहरणे खालीलप्रमाणे :- (1) औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मराठ्यांचा व त्याचा दीर्घकाळ लढा जुंपला. या लढ्यात मराठ्यांप्रमाणेच अनेक जातींमधील लोकांनी देखील प्रामुख्याने सहभाग घेतला. यापैकी महार समाजातील शिदनाक या महार सरदाराचे उदाहरण या ठिकाणी पुरेसे आहे. त्याने सजातीय लोकांची एक पलटण उभारून मोगलांशी झुंज दिली. त्याच्या या पराक्रमाची दखल संभाजीपुत्र शाहूने घेऊन त्यास कळंबी हे गाव इनाम दिले. हे गाव त्याच्या वंशात पुढे इनाम म्हणून चालू राहिले. पेशवाईमध्ये देखील त्याच्या वंशजांनी सरकार चाकरी बजावली. खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईमध्ये उपरोक्त शिदनाकचा नातू शिदनाक याने पेशव्यांच्या वतीने युद्धात सहभाग घेतल्याचा उल्लेख मिळतो. यावरून असे दिसून येते कि, पेशवाईअखेर पर्यंत तरी महारांना अस्पृश्य समजण्यात येत नव्हते. अन्यथा एका महार व्यक्तीस शाहू छत्रपतीने गाव इनाम दिलेच नसते. तसेच एका अस्पृश्याकडे पेशव्यांनी, छत्रपती नामधारी झाल्यावर, सदर गाव इनाम म्हणून चालू दिले नसते !
(2) वाई प्रांतातील नागेवाडी या गावाची पाटीलकी महार घराण्यात असल्याचा उल्लेख अस्सल कागदपत्रांमध्ये आढळून येतो. यावरून पाटीलकी पदावर फक्त मराठा जातीतील लोकांची नियुक्ती केली जात असे असा जो समज आहे तो निराधार असल्याचे दिसून येते. या दोन उदाहरणांवरून अव्वल मराठेशाहीमध्ये तरी महार अस्पृश्य असल्याचे दिसून येत नाही.
पेशवाईमध्ये देखील महारांच्या स्थानास धक्का बसल्याचे किंवा त्यांची अवनती झाल्याचे दिसून येत नाही. अपवाद फक्त पेशवाई अखेरीचा ! पेशवाईमध्ये लष्करी सेवेत महारांचा दर्जा उंचावल्याचे दिसून येते. त्याकाळात लढाईआमध्ये परक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' हा बहुमान दिला जात असे व कित्येक प्रसंगी हा बहुमान महार व्यक्तींनी पटकावल्याचे नमूद आहे. याशिवाय शनिवारवाड्याच्या आत पहारेकरी म्हणून देखील महारांची नियुक्ती केली जात असे. यावरून त्यावेळी महारांची अस्पृश्यतेची कल्पना यावी.
पेशवाईमधील महारांच्या या स्थानास एका नाजूक कारणाने धक्का बसला. शनिवारवाड्यातील एका स्त्रीचा व महार रक्षकाचा संबंध जुळून आला. हि बाब उघडकीस येताच पेशव्याने त्या महार पहारेकऱ्यास देहदंडाची शिक्षा दिली. परंतु एवढे करून पेशव्याचा राग शमला नाही तर पुणे शहरात प्रवेश करताना महार जातीच्या लोकांनी गळ्यात मडके व कमरेस झाडाची फांदी अथवा खराटा बांधावा अशी त्याने आज्ञा देखील काढली. हि आज्ञा नेमक्या कोणत्या पेशव्याने काढली याचा उलगडा होत नाही. जेव्हा ते आज्ञापत्रक मला उपलब्ध होईल त्यावेळी या ब्लॉगवर ते प्रसिद्ध करण्यात येईल. पेशव्याने महार समाजास उद्देशून जी आज्ञा काढली ती बहुतेक पुणे शहरापुरतीच मर्यादित असावी. जर तसे नसते व हि आज्ञा सबंध राज्यात काढण्यात आली असती तर पेशव्याच्या लष्करातील महारांनी आपापल्या नोकऱ्या सोडून पेशव्यांच्या शत्रूंकडे धाव घेतली असती. नारायणराव पेशव्याने प्रभू लोकांच्या विरोधात अशाच प्रकाराची आज्ञा काढून आपला घात ओढवून घेतला होता हे इतिहासात प्रसिद्ध आहेच ! तेव्हा महारांनी देखील अशा पद्धतीचा एखादा प्रयत्न केलाच नसता असे म्हणता येत नाही. असो, यावरून असे सिद्ध होते कि, महारांना अवमानकारक जी आज्ञा पेशव्यांनी काढली होती ती फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती. कदाचित आसपासच्या गावांमध्ये देखील याचे पडसाद उमटले असतील.
स. 1817 - 18 मध्ये इंग्रजांशी पेशव्यांनी जो अखेरचा निर्णायक लढा पुकारला त्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातील अठरापगड जातींनी दोन्ही पक्षांच्या वतीने सहभाग घेतला होता. पैकी महारांच्या बाबतीत बोलायचे झाले तर भीमा - कोरेगावच्या अनिर्णीत लढ्यामध्ये इंग्रजांच्या सैन्यातील महारांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करून निर्णायक पराभव व त्यानंतर होणारी कत्तल टाळली. रायगडावर इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा किल्ल्याच्या बचावासाठी पेशव्याच्या सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. या संग्रामात महारांनी देखील किल्ला लढवताना आपल्या धन्यासाठी, ब्राम्हण पेशव्यासाठी मरण पत्करले !
पेशवाई नष्ट झाल्यावर इंग्रजाची राजवट सुरु झाली. या राजवटीने महारांच्या पदरात फारसे काही पडले नाही. बहामनी बादशहाने त्यांना दिलेल्या सनदेची ब्रिटीश काळात परत एकदा उजळणी झाली. ग्रामीण जीवनात महार हा पहिल्या प्रतीचा बलुतेदार असून तसाच तो वतनदार देखील होता. वतनदारांच्या बाबतीत शिवाजी आणि इंग्रज यांचे धोरण जवळपास एकसारखेच होते. त्यांनी वतने कायम राखली, वतनदार देखील कायम राखले पण त्यांचे अधिकार काढून घेऊन त्यांना सरकारी नोकर बनवले. इंग्रजांच्या या धोरणामुळे महारांचे अधिक नुकसान झाले असे म्हणता येत नाही. याचे कारण म्हणजे, महारांनी बहामनी बादशहाच्या सनदेस इंग्रजांच्या कडून मान्यता मिळवून घेऊन स्वतःचा घात करून घेतला. यामुळे त्यांना 52 हक्कांच्या बदल्यात काही अनिवार्य कामे करणे बंधनकारक बनले. त्याशिवाय बलुतेदार म्हणून जी काही त्यांच्यावर जी काही जबाबदारी होती ती पार पाडणे, वतनदार म्हणून सरकारी आणि गावाची कामे पार पाडणे अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे अनिवार्य असे बनले. एकूण, महारांनी स्वतःच्या हातून स्वतःच्या पायात ' गुलामगिरी ' च्या, ' दारिद्र्याच्या ' शृंखला अडकवून घेतल्या असे म्हणता येते !
ब्रिटीश काळात महारांच्या सामाजिक दर्ज्यात कमालीची घसरण होत गेली. पेशवाई अखेरीस पुणे शहरात त्यांच्यावर गळ्यात मडके व कमरेला फांदी / खराटा बांधण्याची जी शिक्षा किंवा सक्ती केली गेली होती ती ब्रिटीशकाळात देखील कायम राहिली. इतकेच नव्हे तर या प्रथेची अंमलबजावणी पेशवे काळात फक्त पुणे शहरापुरती मर्यादित होती ती ब्रिटीश काळात सर्वत्र प्रचलित झाली ! ब्रिटीश राजवटीने अशा प्रकारे महारांच्या सामाजिक अवनतीस, त्यांच्या अस्पृश्य होण्याच्या क्रियेस एकप्रकारे हातभार लावला असे का म्हणू नये ?
संदर्भ ग्रंथ :-
1) महार कोण होते ? :- संजय सोनवणी
2) शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास :- अनिल कठारे
3) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर