नाग, नाक व नाईक या संज्ञाविषयी चर्चात्मक लेख
मी काही दिवसांपूर्वी याच ब्लॉगवर प्रसिद्ध केला होता. त्या लेखातील अनुमान,
निष्कर्षांत बदल करण्याइतपत नवीन माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा त्या लेखातील
प्रामुख्याने ' नाक ' या शब्दाची चर्चा करण्याचे योजले आहे.
श्री. वासुदेव कृ. भावे लिखित '
मुसलमानपूर्व महाराष्ट्र ( खंड १ ला ) मधील प्रकरण क्र. ३ - महाराष्ट्रांतील
समाजस्थिति ( शातवाहन काल ) ' मध्ये लेण्यांतील शिलालेखांत तत्कालीन
व्यवसायानुरूप श्रेणीसंस्थांची जशी माहिती मिळते तद्वत ' नाक ' हा
प्रत्यय नावांसोबत जोडल्याचेही आढळून येते.
उदा :- ' व्यापारी व
गृहपति नाग याने दिलेले लेणे. ' ( कुडे लेणे १६ वे )
' उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
' उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
गृहपति महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा )
दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे )
व्यापारी मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )
नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसे
लेख १ ला )
वैद्य सोमदेव, वैद्य सोमदेवाचा बाप वैद्य भामकविजय.
सोमदेवाचे पुत्र नाग, ईश्वररक्षित, ईशपालित, शिवघोष ( कुडे लेणे ७ वे )
यास्थळी
प्रथम काही गोष्टींचा खुलासा करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे
कि, सातवाहनांच्या राजवटीचा काळ इ. स. पू. २३० ते इ. स. २२० असा, सुमारे साडेचारशे
वर्षांचा होता. सातवाहन हे हिंदू धर्मीय असून त्याकाळी संस्कृत भाषेचा जन्म व प्रसार
न झाल्याने महाराष्ट्री प्रकृत भाषेचा वापर नाणी व शिलालेखांत केल्याचे आढळून
येते.
दुसरे असे कि, उपरोक्त नावांत असलेल्या गृहपति,
नाक या सज्ञांपैकी गृहपति या शब्दाचा श्री. भाव्यांनी दिलेला अर्थ चुकला आहे.
त्यांच्या मते, ' गृहपति म्हणजे मराठीतील घरधनी. ही पदवी वैश्यांना लावीत असत.
' हा निष्कर्ष त्यांनी एपिग्राफिया इंडिका, भाग ७ वा च्या आधारे काढला आहे.
परंतु नुकतेच श्री. संजय सोनवणींनी सातवाहन समकालीन कुशाण काळात प्रकृत भाषेत
लिहिलेल्या ' अंगविज्जा ' या ग्रंथाविषयीच्या लेखात, ' "गृहपती"
या संज्ञेने जैन व बौद्ध हे दोन धर्म निर्दिशित होतात. ' असे
म्हटले आहे. यामुळे भाव्यांची संस्कृत व वैदिकोद्भव वैश्य थियरी कोलमडून पडते.
परंतु इथे आणखी एक गैरसमज होण्याची शक्यता आहे
व ती म्हणजे ' गृहपति ' हा शब्द जर जैन व बौद्धांचा निर्देश करण्यासाठी वापरला जात
असेल तर याद्वारे डॉ. आंबेडकरांच्या बौद्ध - महार सिद्धांतास आधार मिळतो. पण
प्रत्यक्षात उपलब्ध पुरावे -- सध्या तरी भाव्यांच्या पुस्तकातील -- पाहता
आंबेडकरांच्या सिद्धांतास बळकटी येण्यापेक्षा थोडाफार धक्काच बसतो.
कारण :- व्यापारी व गृहपति नाग याने दिलेले
लेणे. ' ( कुडे लेणे १६ वे )
' उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
' उदमी पुसनाक याची आई शिवदत्ता हिने दिलेले लेणे. ' ( कुडे २२ वे लेणे )
गृहपति महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा )
दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे )
व्यापारी मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )
नाशिकच्या आनंद शेठीचा पुत्र पुष्यनाक ( बेडसे
लेख १ ला )
वैद्य सोमदेव, वैद्य सोमदेवाचा बाप वैद्य भामकविजय.
सोमदेवाचे पुत्र नाग, ईश्वररक्षित, ईशपालित, शिवघोष ( कुडे लेणे ७ वे )
उपरोक्त सर्वच नावांच्या आधी ' गृहपति ' शब्द
योजल्याचे दिसून येत नाही.
येणेप्रमाणे गृहपति संज्ञेचा उलगडा होतो परंतु
' नाक ' हा शब्द तसाच अनुत्तरीत राहतो. श्री. भाव्यांनी आपल्या ग्रंथात नाक या
शब्दाचा अर्थ, ' नायक ' देत असे म्हटले आहे कि, ' लेण्यांतील लेखांत इतरत्र गण
शब्द आढळत नाही. पण नाक हा प्रत्यय सर्वत्र आढळतो. व तोही बहुधा व्यापाऱ्यांच्या
नावाला लावलेला असतो. ' उदाहरणादाखल त्यांनी पुढील नावे दिलेली आहेत :- गृहपति
महादेव नाक ( कार्ले, लेख ५ वा व ६ वा ), दुकानदार पुसनाक ( कुडे, लेणे २२ वे ), व्यापारी
मसूलनाक ( कुडे, लेणे १६ वे )
यास्थळी भाव्यांच्या तर्कावर भिस्त ठेवायला
हरकत नव्हती परंतु त्यांनी बऱ्याच ठिकाणी अर्थाचे अनर्थ करत आपली विश्वासहर्ता
गमावल्याने त्यांवर विसंबून राहणे धोक्याचे आहे.
मध्ययुगीन काळात ' नाक ' हा प्रत्यय विशिष्ट
जातीसमूहातील ठराविक लोकांच्या नावामागे जाई, त्यावरून या शब्दाला तेव्हाच्या
सामाजिक स्थितीत श्रेष्ठ अथवा पुढारी असा अर्थ प्रचलित होता हे उघड आहे. त्याच
काळात ' नाईक ' हि संज्ञाही वापरात असून याद्वारे लष्करी पद, बहुमान दर्शक किताब,
सावकारांचा निर्देश होत असे.
माझ्या मते, नाक या शब्दाचे संस्कृत रूप नाईक आहे.
तसेच मध्ययुगात हे दोन्ही शब्द वापरात होते. परंतु प्रश्न असा असा उद्भवतो कि,
एकाच काळात मूळ शब्द व त्याचे विकसित वा संस्कृत रूप प्रचलित का राहावे ? याचे
उत्तर सद्यस्थितीत तर्काच्या आधारेच देणे भाग आहे व ते असे :-
मध्ययुगीन काळात समाजमनावर वैदिक धर्म -
संकल्पनांचा प्रभाव पडून बव्हंशी हिंदू धर्मीय समाज त्या प्रवाहात वाहवत गेला.
त्याचे स्वाभाविक परिणाम वाईटही झाले. उदा :- जातीसंस्थेबाबत. सातवाहन काल तसेच इ.स.
च्या चौथ्या - पाचव्या शतकापर्यंत इथे जातीसंस्था अस्तित्वात नव्हती हे वैदिकांच्या
मनुस्मृति -- त्या काळातच पूर्णावस्थेस पोहोचलेल्या स्वरूपा -- वरून दिसून येते.
सातवाहन सामाजिक स्थितीचा संदर्भ घेतला तर
व्यवसायांच्या श्रेणी होत्या. या श्रेण्या व्यवसायांवर आधारित असून श्रेणीसंस्था
मोडीत निघाल्यावर तिचे विघटन जाती - उपजातींत होत गेले.
हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासाप्रमाणेच धार्मिक
इतिहासातही अनेक चढ - उतार आल्याने वैदिकांचा उत्कर्ष काल येताच येथील हिंदू
समाजमन त्याच्या प्रभावाखाली गेलं. त्यांची वर्णसंस्था तीच आपली जातीसंस्था मानून
बसलं. अर्थात हा बदल काही वर्षांत, दशकांत न होता यासाठी शतकांचा अवधी लोटावा लागला
असला तरी वैदिक धर्मप्रभावाखाली हिंदू समाजांतर्गत बदल झाले हे निश्चित. अशा
स्थितीत जे आपल्या मूळ हिंदू परंपरांना चिटकून राहिले त्यांच्या संज्ञा तशाच राहणे
अपरिहार्य आहे व ज्यांनी काळानुरूप बदल स्वीकारले त्यांच्या सामाजिक दर्जा, संज्ञांत
बदल होणेही स्वाभाविक आहे. परंतु अंतिमतः स्थिती पाहता मध्ययुगापर्यंत मूळ हिंदू
परंपरेला चिटकून बसलेले व वैदिक प्रभावाखाली आलेले, आज दोन्ही घटक आपला
पूर्वेतिहास, सामाजिक आत्मभान गमावून बसले आहेत. असो.
प्रस्तुत लेखाचा निष्कर्ष याक्षणी जरी अंतिम
असला तरी तो पूर्णतः अंतिम वा निर्णायक नाही. जसजसे नवनवीन पुरावे समोर येतील
तसतसे आहे त्या निष्कर्षास बळकटी मिळणे वा बदल होणे स्वाभाविक आहे. परंतु हे कार्य
केवळ एका व्यक्तीचे नसून सर्वच स्वतंत्रवृत्तीच्या अभ्यासकांचे आहे, एवढे जरी
लक्षात घेतले तरी पुरेसे आहे.