श्री. य. न. केळकर
यांच्या ' मराठेशाहीतील वेचक वेधक ' या पुस्तकातील ' संभाजी
महाराजांची समाधी ' या लेखात " ... संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने
केल्यानंतर त्यांचे शव त्याने कोल्ह्या - कुत्र्यांकडून खावविण्याकरता टाकून दिले
होते. नंतर त्याच्या शवाचे तुकडे व शीर एकत्र करून, उचलून नेऊन एका मराठा सरदाराने
त्यास मौजे वढू येथे विधीपूर्वक अग्नी संस्कार केला व तेथे अर्थातच छोटीशी देवळी
पण केली. दहनाची ती जागा निश्चित होती आणि म्हणूनच पुढे शाहू महाराजांनी त्याच
स्थळी पक्के वृंदावन बांधले. "
खेरीज या वृंदावनाची
पूजा - अर्चा नित्य व्हावी व अन्नछत्र चालावे याकरता शाहूने माणसे नेमून त्यांना
इनामही दिले होते, त्याची नोंद खालीलप्रमाणे :-
"
कै. संभाजी राजे स्वामी यांचे वृंदावन दर जागा मौजे वढूत || पाबळ येथे करून
शुश्रूषेसाठी व व्यवस्थेसाठी भिकाराम गोसावी, वासुदेवभट, शामभट धर्माधिकारी ठेवून
धूपदीप, नैवेद्य, बागतुलसी व अन्नछत्राबद्दल बागाईत जमीन बिघे ५, कोरडवाहू वहीत
जमीन बिघे २० आणि बाकीची पडजमीन बिघे १०५ मिळून १२० बिघे जमीन दिली. "
या संबंधी अधिक चर्चा
करण्यापूर्वी हे नमूद करणे योग्य ठरेल कि प्रस्तुत लेख केळकरांनी स. १९६९ च्या
नोव्हेंबर मध्ये लिहिला होता.
आता आपण संभाजीच्या
विश्वसनीय चरित्रांपैकी डॉ. सौ. कमल गोखले लिखित ' शिवपुत्र संभाजी '
मधील या संबंधीची माहिती पाहू.
डॉ. गोखलेंच्या संशोधनानुसार
संभाजीला औरंगजेबाने वढू येथे ठार केले. याकरता पुरावा म्हणून धनकवडीच्या कुलकर्ण्याच्या
कागदपत्रातील दि. १४ जानेवारी १७१९ चा मजकूर त्यांनी दिला आहे तो असा :- "
पातशहा वढू कोरेगावी येऊन मुक्काम केला. तेथून लष्कर पाठवून, सिवाजी राजे पहिलेच
गेले होते, त्याचा लेक संभाजी राजे धरून आणिला आणि ( को| किंवा मौजे ) वढू
कोरेगावात मारिला. मग त्याचा लेक शाहू राजा व बाईका आपल्या जालीत ठेविली. "
तसेच वढू - तुळापुर
संबंधी टिपेत त्यांनी अधिक माहिती अशी दिली आहे कि :- " वढूला शिरच्छेद
केल्यानंतर तुळापुर येथील संगमावर संभाजीराजांचे दहन केले असावे, याला कागदोपत्री
आधार मिळत नाही. संभाजीमहाराजांच्या शवाला जे शिवले त्यांना शिवले पाटील हे नाव
मिळाले, असा समज असला तरी ती एक भाकड कथाच आहे. शिवपूर्वकाळापासूनच ' सिवले पाटील
' नावाचे उल्लेख आढळतात. "
संभाजीच्या मृतदेहासंबंधी
डॉ. गोखलेंनी असेही लिहिले आहे कि, " .. संभाजी राजांचा छिन्नविच्छिन्न
देह वढू बुद्रकात फेकण्यात आला. शाहू आणि येसूबाई औरंगजेबाच्या कैदेतून सुटून
आल्यानंतर त्याच जागी शाहू महाराजांनी १७१५ सालापूर्वी आपल्या वडिलांचे वृंदावन
बांधले. "
खेरीज संभाजीच्या
वृंदावनाविषयी दि. १८ जानेवारी १७१५ चा पेशवे दप्तरातील एका कागदातील मजकूरही
त्यांनी दिला आहे. त्यानुसार, " राजमंडळ - वृंदावने: वृंदावन महाराज राजश्री
कैलासवासी संभाजी राजे स्वामी. दर जागा मोजे वढू, ता|| पाबळ, प्र|| जुन्नर भिकाराम
गोसावी व वासुदेवभट बिन शामभट धर्माधिकारीणी वृंदावनाचे शुश्रूषेबद्दल देविले
आहेत. नैवेद्य व नंदादीप व धूप बाग करावयास व तुलसी लावावयास व अन्नछत्राबद्दल
इनाम जमीन छ २२ मोहरम सन खमस अशर मौजे मजकूरपैकी इनाम जमीन नूतन *५ बागाईत जमीन *१०
वहीत जमीन सेत चौसुक वृंदावनानजिक आहे. त्यांपैकी .|||. १५ पड जमीन - तीन प्रतीची
१|- असामी इनाम जमिनी घातली आहे. "
( चिन्ह '*' खुलासा
:- जमिनीच्या मोजमापाबद्दल तत्कालीन प्रचलित चिन्ह दर्शवले असून ते टाईप होत
नसल्याने '*' या चिन्हाची योजना केल्याची नोंद घ्यावी. )
शिवाय संभाजीच्या
वृंदावनाची गोविंद गोपाळ ढगोजी मेगोजी हा झाडलोट करत असून शाहूने त्यांस इनाम जमीन
दिली होती. त्यासंबंधी पेशवे दप्तरातील दि. १९ मे १७२३ च्या कागदपत्रातील डॉ.
गोखलेंनी दिलेली नोंद पुढीलप्रमाणे :- " गोविंद गोपाळ ढगोजी मंगोजी हे
तीर्थरूप राजश्री कैलासवासींचे वृंदावन मोजे वढू तर्फ पाबळच्या राणांत आते तेथे हे
राहून वृंदावनाची सेवा करिताती. याजनिमित्य स्वामी याणी कृपाळू होऊन मौजे वढू तर्फ
पाबळ येथील खालसा पड जमिनीपैकी अवल दुम सीमती प्रतीची जमीन बिघे कुलबाब कुलकानु इनाम
दिली. *५ ..."
संभाजीच्या वृंदावन
सेवेबद्दलच्या दोन सनदांपैकी एक वासुदेवभटादींची सनद श्री. केळकरांनी दिली असून
डॉ. गोखलेंनी त्या सनदेसोबतच गोविंद गोपाळच्या सनदेतील काही मजकूर उदधृत केला आहे.
इथे हि गोष्ट नमूद करणे आवशयक आहे कि, डॉ. गोखले लिखित संभाजी चरित्राची प्रथम
आवृत्ती स. १९७१ साली प्रकाशित झाली होती. असो.
उपरोक्त माहितीवरून
संभाजीच्या समाधीची वा सनदांतील उल्लेखानुसार वृंदावनाची स्थळ निश्चिती जशी होते
त्याचप्रमाणे त्याचे सेवेकरी कोण होते याचीही माहिती मिळते. परंतु मूळ प्रश्न असा
आहे कि, संभाजीच्या मृतदेहाचे दहन झाले होते कि नाही ?
श्री. केळकर मोघमपणे
मराठा सरदाराचा उल्लेख करतात. पण नाव देत नाहीत. केळकरांसारख्या अभ्यासू संशोधकाकडून
असा हलगर्जीपणा अपेक्षित नाही. परंतु त्यांच्या लेखसंग्रहाचे पुस्तक त्यांच्या
पश्चात प्रकाशित झाल्याने यासंबंधी त्यांच्यावर टीकाही करता येत नाही. असो.
संभाजीच्या
चरित्रकार डॉ. गोखलेंच्या मतानुसार संभाजीच्या डेड बॉडीचे दहन झालेच नाही.
संभाजीच्या खुनाचा विपर्यास्त वृत्तांत पाहता दहनाकरता त्याची बॉडी वा मृतदेहाचे
काही अवयव औरंगजेबाने शिल्लक ठेवले होते कि नव्हते याविषयी शंकाच आहे. दुसरे असे
कि, संभाजीच्या डेड बॉडीच्या दहनाविषयी कोणत्याही मराठी सरदाराने --- मग तो मोगल छावणीतील
का असेना --- बादशहाकडे रदबदली केल्याचा समकालीनच काय पण नंतरच्या काळातीलही
उल्लेख मिळत नाही. यावरून डॉ. गोखलेंच्या अनुमानासच अधिक बळकटी प्राप्त होते.
परंतु यानंतरही प्रश्न
शिल्लक राहतोच व तो म्हणजे, अभिषिक्त राजाच्या मृतदेहच्या दहनाची परवानगी
मिळवण्याचे प्रयत्न का झाले नाहीत ? काही एक दंडादाखल रक्कम भरून गुलाम, कैदी,
युद्धबंदी, ओलीस तसेच मृतदेहांची सुटका त्या काळी केली जात असे. मग संभाजीच्या
बाबत असे का न घडावे ?
औरंगजेबाच्या छावणीत
कित्येक मराठी सरदार -- त्यातील काही संभाजीचे आप्त व त्याची नोकरी सोडून आलेले --
तसेच प्रतिष्ठित राजपूत सरदार असतानाही हा प्रकार घडावा ? कि संभाजी बद्दल कोणाला
आपुलकीच राहिली नव्हती ? शिवाजीच्या मृतदेहास मंत्राग्नी मिळाला वा भडाग्नी दिला
यावर वाद होतो. हा कितपत योग्य वा अयोग्य हा भाग जरी बाजुला ठेवला तरी त्याच्या मृतदेहाचे
दहन निदान हिंदू परंपरेनुसार तरी झाले. मग संभाजीच्या मृतदेहा नशिबी हा योग नसावा
? याचे थोडे वाईटही वाटते व आश्चर्यही !
इतिहास संशोधन, लेखनाच्या बाबतीत अजून आपण बाल्यावस्थेत आहोत. इतिहासलेखनाची समग्र सामग्रीही आज आपणांस उपलब्ध नाही. पण हे सर्व मान्य करूनही नवा पुरावा समोर येईपर्यंत संभाजीच्या मृतदेहास साधा दहनविधी लाभू देण्यातही मराठी समाजास यश लाभले नाही हा डाग मात्र कायम राहील !
५ टिप्पण्या:
लेखन उत्तम आहे पण कमल गोखले यांनी पण योग्य असा संदर्भ दिला नाही शिवले यांच्या नाव छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्या झाली या आगोदर होते म्हणून जर आपल्या कडे काही संदर्भ असतील तर कृपा करून दयावी मला
कमल गोखले यांनी पण अर्धवट माहिती दिली आहे तसे संदर्भ नमुद न करता त्यानीं सिवले पाटील यांच्या नावाने फक्त भाकड कथा असा उल्लेख केला पण त्याचे संदर्भ दिले असते किंवा सिवले पाटील यांची पाटील की कधी पासून आहे यबद्दल एखादे वतनपत्र किंवा सिवले पाटील नाव चे काही तरी संदर्भ त्याना भेटले असतील किंवा नाही या बद्दल त्यानी विशेष काहीच लिहिले नाही फक्त त्यानीं ती एक भाकड कथा आहे जर त्याना याबद्दल माहिती मिळाली असावी पण त्यानी ती नमूद न केल्या मुळे परत प्रश्न उत्पन्न होतो नक्की भाकड कथा आहे की कमळ गोखले यांचे लिखाण खरे आहे ?
पेशवे दप्तर मध्ये पुणे जमाव चा जो संदर्भ नमुद केला आहे ती नक्की कोणत्या काळातील आहे या बद्दल पण माहिती आपल्या कडे असेल तर दयावी
त्या गोखले ला जाऊन भेटावं लागेल ।
नाही तर शिवले पाटील च काही खरं नाही। नाहीतर गोखले ला म्हणावं थोतांड बंद कर । आणी पुन्हा पुस्तक प्रकाशित करावे, आक्षेपार्ह मजकुर वगळून
गोपाळ गायकवाड गावपाटलाच्या आज्ञेने बादशहाच्या छावानित बिगारी म्हणून जात होते . छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि विटंबणा प्रत्यक्ष पाहूनही गोपाळ गायकवाड आणि त्यांच्या सहकारी जाती बांधवाचा काहींच इलाज चालना र नव्हता . मात्र त्यांनी रात्री उशीरा तुळापूर हून वडू बुद्रुकला जाताना अतीशय दक्षपने चोरूण
छत्रपती शंभू राज्यांचे देहाचे तुकडे रेडयाच्या पाठीवरील पाणी _ पुरवण्याच्या पखालीत 'घोंगडींचा खोळीत घालून आपल्या वस्तीत आणले . बादशहाचे सैन्य छावन्या हत्ती ' घोडे ' उंट शेजारील अनेक गावात पसरले होते . सबब गाव गोळा करणे शक्य नव्हते . बोटी बोटी देहाचे तुकडे शिवणे आणि पुन्हा शरिरासारखे जुळवणे शक्य तरी आहे का ? आणि वेळ तशी होती का ? किती दहशत / भीती असेल याची कल्पना आपण करु शकतो . आणि वेळ मध्यान रात्रीची . म्हणून महारांनीच आपल्या जागेत छत्रपतींच्या प्रेतास मुख अग्नी देवून अत्यसंस्कार केला . त्या महारानी हे जे काम केले ते छत्रपतींच्या प्रेमापोटी आत्मियतेने केले .केानताही फायदयाच्या विचाराने नाही .परंतू जेव्हा छ . शाहू सुटका होूवून आले ... आणि त्यांनी जेव्हा आपल्या पित्याच्या समाधीचा शोध घेतला तेव्हा गावातील पुढे -पुढे करणाऱ्या प्रमुख मानसानी ( प्रत्येक गावात जसे असतात तसे ... सगळ मीच करतो अस सांगणारे ) कथेला अती रंजीत करुन स्वतःची नावे त्याला जोडलत आणि मूळ पात्रांना बाजूला सारुन स्वतःच्या नावाने वतने मिळवून आपला कार्यभाग साधला . तेही महत्वाच नाही .पन खरा इतिहास झाकून भाकडं कथा (-ज्या पटत नाहीत ) त्या ऊर बडवून सांगीतल्या जातात हे चुकीचे आहे . खरोखर ज्या महारांनी त्या शिवपुत्त्रत्राच्या मृतदेहाला अग्नीसंस्कार करून मुक्ती दिली त्यांचे रूण माणावे का नको ? बाकी जमीनी आणि वतन ही शुल्लक बाब आहे . महारांनी त्याची तेव्हाही अपेक्षा केली नाही आणि आताही करत नाहीत ...
ते जाऊदे तु महार आहेस ना ....
मग एवढ जे काही बोललास त्याचे समकालीन नोंद का नाही किंवा काही पुरावे आहेत काय...???
भाकड कथा तर ही आहे..
चराचरा कापले...
ब्राम्हण विरोध करता करता इतीहासातही घुसायला लागले...
५००×२५०००
रायप्पा महार गोवींद महार सारखी फेक कैरेक्टर शिवले पाटील खरा आहे...
टिप्पणी पोस्ट करा