रविवार, १९ जुलै, २०१५

बुराडी घाट तसेच पानिपत मोहिमेवर प्रकाश टाकणारे महत्त्वाचे पत्र



                                      
                                      श. १६८१ (?)
                                      इ. १७५९ (?)

                        
                           श्री

    पौ| छ १४ माह जमादिलावल
    पु|| श्रीमत राजश्री --------------- बापूसाहेब
    स्वामीचे सेवेसी 

    विनती सेवक बालाजी गोविद ऐसीजे दोन जोड्या कासिदाच्या समागमे पत्रे पाठविली त्यातून येकाही पत्राचे उत्तर न पाठविले याचा अर्थ काय सेवकावर इतकी अवकृपा करणे हे साहेबास विहीत नाही साहेबानी तो सदैव पत्रोतरी सेवकाचा सांभाळ केला पाहिजे यानंतर येथील प्रसंग तो पूर्वी श्रीजीनी श्रीमंतास खलिता पाठविला होता त्याचेही उत्तर किमपि न पाठविले यावरून आश्चर्ये वाटले की स्वामीसारखे आमचे मुरबी असोन दरजवाबही देत नाही याचे कारण काय त्यास मागती तेच जोडी पाठविली आहे तर खलीताचा जवाब वरकड जवाब सवाल उगवून प|| पाहिजे यानंतर या दिवसात राजश्री मल्हारजी होळकर यानी प्रगणियात धूम मांडली व – गाजुदीखान वजिरानी महबूबसिंग व सैफुदी महमदखानास आलाबत महमुदाचा बंधू उभयेतास राजश्री मल्हारबाकडे पाठविले की तुम्ही जाऊन सिघ्र घेऊन येणे तेही उभयेता काल छ २० माहे मजकुरी श्रीजीची मुलाजमत केली श्रीजीनी बहुत त्यासी येकांत केला बहुत राजी जाले की आजची बलाये साहा महिन्यावर जाऊन पडली नकले पठाण याजला मारून घेतो किंवा हे त्याजला मारून घेतात सध्या ......... भक्षायास मिलेल – तुवर तो पाहत नाहीत बहुधा मलारबा तिकडे जाऊन पठाणास सिक्षा देतील यात संदेह न जाणावा राजश्री जनकोजी सिंदे याज शामील वजीर जाला रोहिल्याची मामलतीचा ठहराव रोहिला तो आंतरवेदातील प्रगणे व बाकीचे रुपये तो देतो सरदार मानीत नाहीत सरदार म्हणतात की पारचा मुळुक तुमचा आंतरवेदातील आमचा इतकी भांजगड मात्र लागली आहे दो चौ रोजात निकाल होऊन जाईल शुजायेदौलाही सरदारास भेटीची इच्छा ठेवितो कुल बाकी बेबाक करून देतो तरी सरदार म्हणतात की कुल बाकी व प्रयागचा किला इतके देत असला तर सळूक आहे नाही तर नाही या प्रकारचे तिकडील जवाब सवाल आहेत श्रीमंत नानासाहेब प्रगणे साहरपुर हवेलीत आहेत वरकड वजिराचे जवाब सवालात रा| त्रिंबकपंत बाबा म्हणून तेथून लिहिले आले दुबराऊन आलिया सेवेसी विनंती केले जाईल स्वामीनी सदैव जोडीसमागमे प्रत्योत्तरी सेवकाचा सांभाळ घेतलां पाहिजे बहुत काय लिहिणे कृपा लोभ कीजे हे विज्ञप्ति.


    टीप :- पत्राची तारीख संपादक श्री. सदाशिव आठवले यानी मजकुरावरून अंदाजे दिली आहे. पत्रांत ज्याचा उल्लेख ‘ श्रीजी ‘ आला आहे तो कोण याची स्पष्टता होत नाही. पत्राच्या अखेरीस ‘ श्रीमंत नानासाहेब ‘ म्हणून उल्लेख आहे तो पेशव्याला नसून बहुधा पुरषोत्तम हिंगणे यास अनुलक्षून असावा. कारण याचेही टोपणनाव ‘ नाना ‘ असेच होते. संपादकीय कालनिश्चितीनुसार पत्र बुराडी घाटच्या आधीचे असल्याने त्यांस अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

सदर पत्र संदर्भ ग्रंथात दिल्यानुसार जसेच्या तसे उतरवून घेण्याचा प्रयत्न केल्याची नोंद घ्यावी. )



    संदर्भ ग्रंथ :-
१)      हिंगणे दफ्तर : तिसरा खंड :- संपादक - सदाशिव आठवले    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: