सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

पानिपत बद्दल थोडेसे




    “ .... ... आप्त होते, बळवंतराव मातुल व नाना पुरंदरे वगैरे, ते अनाप्त झाले. अनाप्त शाहानवाजखानी भवानीशंकर वगैरे ते आप्त झाले. त्यांचे वाक्याचे ठायी विश्वास तेणेकरून आपली रीत युद्धाची सोडून यवनाची रीत धरली. “

     ( संदर्भ ग्रंथ :- नाना फडनवीस यांचे चरित्र ( आत्मचरित्रासह ) :- वा. वा. खरे )

    जोपर्यंत शाहनवाज खान, भवानी शंकर वगैरे गृहस्थ कोण होते व पानिपत स्वारीतील त्यांची नेमकी भूमिका काय होती याचा उलगडा होत नाही तोवर पानिपत मोहिमेतील किमान ७० ते ८० % सत्य तरी आपणांस समजणार नाही.

    नाना फडणीसच्या आत्मचरित्रातील उपरोक्त नोंद जवळपास सर्वच पानिपत अभ्यासकांनी वाचली असूनही त्याकडे माझ्यासहीत सर्वांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे आता सिद्ध झाले आहे व हा मूर्खपणा माझ्याही हातून घडल्याचे मी या स्थळी जाहीरपणे कबूल करत आहे.

२ टिप्पण्या:

प्रसाद साळवी म्हणाले...

thodi vishayaalaa sodun vinanti aahe.

Baajiraav ani Mastani chya sandarbhaat aitihaasik dasta-aivajaat kay mahiti uplabdha aahe? aaplya vaachnaat/abhyaasaat kahi aale aslyaas tyavar thoda prakaash taakaal ka? Ekhadi swatantra post lihilyaas uttamach.

sanjay kshirsagar म्हणाले...

prasad salvi जी,
मस्तानीच्या पूर्वेतिहासाबद्दल निःसंदिग्ध अशी माहिती आजवर तरी माझ्या वाचनात आलेली नाही. या प्रकरणी जे काही वाचन मी केलंय त्यावरून पेशव्यांच्या कौटुंबिक कलहामुळे या प्रकरणास अवास्तव महत्त्व आल्याचं माझं प्राथमिक मत आहे. तरीही अधिक माहिती मिळाल्यास याविषयी स्वतंत्र लेख जरूर लिहीन !