पुरंदरे दप्तर भाग १ ला,} { श. १६७० वैशाख -
ज्येष्ठ
ले. २१९, पृ. १६० } { इ. स. १७४८ एप्रिल -
मे
श्रीशंकर
चिरजीव राजश्री नाना ( पुरंदरे ) यासी प्रती रघुनाथ बाजीराव आसीर्वाद
उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले लिहिला
मजकूर कलला ऐसियास आम्ही दो चौ रोजा आड पत्रे पाठवितो परंतु तुम्हास पावतात न पावतात
हे काहीच कलत नाही आम्ही तर दो चौ रोजा आड येखादे पत्र पाठवितो विशेष काही लिहिले
नाही यानंतर येथे तीर्थरुपाची ( नानासाहेब पेशवे ) पत्रे आली की तिकडील पठाणास
हिकडून या पातशाहाची फौज गेली होती तिणे मोडिले ते दो चौ हजारानिसी पलाले ऐसी
पत्रे आली आतां दिसोन येते की यंदा प्रायः तीर्थरूप देशास येतील मग पुढे होईल ते
कलल्यासारिखे लिहू तुम्हास कलावे म्हणून लिहिले असे तिकडील वर्तमान वरचेवर लिहित
जाणे आमचे येथे राहावयाचे बरे उत्तम प्रकारे तीर्थरुपाची मर्जी व विद्याभ्यास
करितो दरबारास दुवख्त जातो दंड काढतो बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.
संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द.
वि. आपटे, रा. वि. ओतुरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा